बातमीचा परिणाम : अखेर देहूरोड ते निगडी दरम्यान महामार्गावर वा
देहूरोड : संत तुकाराम महाराज पालखी सोहळा लाखो वारकऱ्यांच्या सहभागाने जुलै महिन्यात मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावरून देहू
स्थानिकांनी याबाबत खासदार श्रीरंग बारणे यांना निवेदन दिल्यानतर बारणे यांनी संबंधितांना उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या होत्या . याबाबत संतभूमी न्यूजने ६ जूनला सविस्तर बातमी प्रसिद्ध केली होती . संतभूमी न्यूजने बातमी व पाठपुरावा केल्याने शुक्रवारी देहूरोड ते निगडी महामार्गावर लोखंडी संरक्षक कठडे बसविण्यास रस्ते विकास महामंडळाने सुरुवात केली असून येत्या ३० जूनपर्यंत सर्व कामे पूर्ण करण्यात येणार आहे .
देहूरोड ते निगडी दरम्यान पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांना विविध समस्यांना सामोरे जावे लागण्याची शक्यता असल्याने या मार्गाचा ताबा असणाऱ्या राज्य रस्ते विकास महामंडळाकडून महामार्गावरील विविध समस्या पालखी प्रस्थानापूर्वी दूर करून वारकऱ्यांची गैरसोय थांबवून अपघात विरहित वारी होण्यासाठी तातडीने कार्यवाही करण्याची मागणी स्थानिकांनी रस्ते विकास महामंडळाकडे गेल्या महिन्यात २५ मेला निवेदनाद्वारे केली होती . शुक्रवारी (दि. ५ जून) प्रत्यक्ष पाहणी केली असता देहूरोड ते निगडी दरम्यान रस्ता बांधल्यानंतर बसविलेले लोखंडी रेलिंगची दुरवस्था झालेली होती . तुटलेले रेलींग काढल्याने व पुन्हा दुरुस्ती न केल्याने गर्दीतील वारकरी व भाविक वाटचालीत रस्त्यालगतच्या उंच कठड्यावरून थेट खोलगट भागात जमिनीवर पडून अपघात होण्याची शक्यता होती . पालखी सोहळ्यातील वाहने तसेच पायी चालणाऱ्या भजनात तल्लीन होऊन चालणाऱ्या वापरकर्त्यांना व पालखीसोबत निगडीपर्यंतपायी जाणाऱ्या पंचक्रोशील भाविकांना अपघात होण्याची शक्यता व्यक्त जात होती .
देहूरोड ते निगडी दरम्यान महामार्ग लगत काही ठिकाणी काटेरी झाडाझुडपांच्या फांद्या, माती ,खडी व गवत मार्गावर आले असल्याने पालखी सोहळ्यातील भजनात तल्लीन होऊन चालणाऱ्या वारकऱ्यांची गैरसोय शक्यता होती . महामार्गाच्या झाडांच्या बाजूला तुटलेल्या संरक्षक लोखंडी जाळ्यांसह कठडे निघून दुरवस्था झालेली आहे. महामार्गावरील पांढरे पट्टे पुसट झालेले आहेत . रस्त्याच्या पांढऱ्या पट्टयांवर तसेच दुभाजक व डाव्या बाजूला पांढरे, लाल व पिवळे आय कॅट रिफ्लेक्टर लावलेले नाहीत . महामार्गावरील बहुतांशी पथदिवे बंद असून संत तुकाराम महाराज प्रवेशद्वारासमोर विरस्थळ चौकातील (महामार्गावर ) चौकातील चालू बंद होणारे दिवे व पथदिव्यांचा खांब अपघातानंतर बसविण्यात आलेला नाही . अशा विविध समस्यांमुळे देहूरोड ते निगडी रस्तावर येणाऱ्या भाविकांसह वारकऱ्यांसाठी असुरक्षित बनला असल्याने तातडीने संबंधितांकडून कार्यवाही करणेबाबतचे निवेदन खासदार श्रीरंग बारणे यांना देण्यात आले होते .
याबाबत बारणे यांनी तातडीने रस्ते विकास महामंडळाच्या कार्यकारी अभियंता शैलजा पाटील यांच्याशी संपर्क साधत देहूरोड ते निगडी दरम्यानची सर्व संबंधित कामे तातडीने सुरू करून गैरसोयी दूर करण्याचे निर्देश दिले होते .























