किवळेतील अरविंद सांडभोर यांनी केली तिरुपती पायी वारी ; सर्वत्र त्यांचे होतेय कौतुक
पिंपरी : मनपा परिसरातील किंवळे येथील उद्योजक अरविंद बापूराव सांडभोर यांनी किवळे ते तिरूपती बालाजी दरम्यान ११०० किलोमीटरचमी पायी वारी नुकतीच पूर्ण केली .
अरविंद सांडभोर यांनी दिलेल्या माहितीनुसार पायी वारी करत तिरुपतीला जातोय असे स्वप्न त्यांना पडल्याने त्यांनी तिरुपती बालाजीची आज्ञा समजून त्वरित यात्रेची तयारी सुरू केली . याची कोणतीही पूर्व कल्पना कुटुंबाला दिली नाही.केवळ एक दिवस अगोदर पत्नी व मुलगा यांन कल्पना दिली अर्थात त्यांचा विरोध नव्हता परंतु पायी जायचंय यामुळे ते चिंतेत होते. सर्व चिंता देवावर ठेवून एक ड्रायवर व आवश्यक ते गरजेचे साहित्य सोबत घेऊन प्रवासाचा श्रीगणेशा दि. १९ फेब्रुवारी २०२६ ला केला.
आतापर्यंत अरविंद यांनी १४१ मासिक वाऱ्या वाहनाद्वारे केल्या आहेत. सलग वारी करणारे सांडभोर कदाचित महाराष्ट्रातील एकमेव भक्त असावेत .त्यांनी जवळपास उपलब्ध सर्व प्रवासाची साधने यात बस ,रेल्वे, ट्रक, विमान आदि वाहनाचा वापर करत आजतागायत वाऱ्या पूर्ण केल्या आहेत.
त्यांच्या एकुलत्या एक मुलाचे लग्न देखील तिरुपतीच्या साक्षीने पवित्र भूमीत करण्याचे नियोजन केले व तशी अट वधूपित्याला ठेवली होती . हा विवाह पूर्णतः दक्षिणी पद्धतीने तिरुपतीला डिसेंबर २०२५ ला संपन्न झाला.. ते पूर्णतः बालाजीमय झालो आहे त्यांची १४२ वी वारी पिंपरी चिंचवड ते तिरुपती बालाजी पायी पूर्ण केली आहे .
ते स्वतः उन्हाळ्यात दक्षिण भारताकडे निघालो होते . ऊन किती भयानक असते याची जाणीव असून देखील वारीत एकूण अंतर ११०० किलोमीटर जायचे ध्येय होते . १९ मार्चला गुढी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर तिरुपती दर्शन घेण्याचा संकल्प पूर्ण करण्याचा निर्धार होता.
अगोदर मॉर्निंग वॉक शिवाय कधी ही कोणतीही पायी वारी केली नाही . त्याचा अनुभव ही नाही सारी भिस्त बालाजीवर ठेवून या प्रवासात सोबत गाडी व वाहन चालक मित्र व आवश्यक ती कपडे , साहित्य सोबत घेऊन मार्गस्थ झालो होतो .पुणे ते माळशिरस प्रवास केल्यावर स्वतः हा प्रवास पूर्ण करेल की नाही असा प्रश्न पडला शरीर व मन दोघेही थकले होते स्वतः वरच शंका येऊ लागली होती , अशाच अवस्थेत त्यांना धीरेंद्र साहू नावाचे झारखंड राज्यातील शिवभक्त त्या ठिकाणी भेटले त्यांनी १६ महिन्यांपूर्वी गाव व घर सोडले होते . त्यांची यात्रा संकल्प हा ज्योतिर्लिंग व चार धाम असा होता व त्यांनी आतापर्यंत १७ हजार किमी.पायी प्रवास केला होता व अद्याप २ जोतिर्लिंग दर्शन बाकी होते. प्रवासाची दिशा विधात्याने निश्चित केली होती. त्यांना वाटते गोविंदानेच ही योजना आखली असावी कारण हे २ पांतस्थ त्यांचा यात्रा उद्देश भिन्न मात्र सहवास १५ दिवसांचा लाभला . शिव व विष्णु भगवान यांच्या भक्तांची गाठभेट , सहवास हा दुर्मिळ योग असावा. या सहवासाने त्यांच्या मनाची मरगळ गेली . कधी एकदा गोविंदाचे चरणी नतमस्तक होईल , असे झाले होते या देवकृपेने सांडभोर यांची पदयात्रा मात्र अंतिम टप्प्यात आली होती .
या प्रवासात जंगलही लागले होते त्यामधून भल्या पहाटे व रात्री प्रवास करताना अनेक जंगली प्राणी व पक्षी यांची भेट होत होती मात्र मुखी गोविंदाचे स्मरण असल्याने वाईट काही घडले नाही , पण भीतीने गाळण झाली होती. विचित्र आवाज यायचे पण कुठेही थांबू नका असा सल्ला स्थानिकांनी दिल्याने त्याची मदत झाली .

जंगलातून बाहेर आल्यावर रस्त्याने भर दुपारी थंड ताक मिळेल का , असा शोध घेतला पण नाही मिळाले पाणी पिऊन प्रवास सुरू ठेवला होता अशातच दुचाकीवरून एक जोडपे चालले होते व त्यांनी ताकाची बाटली हातात दिली व निघून गेले. त्या बाटलीकडे पाहून मनात प्रश्न आला ३-४ दुकानांत ताक नाही मिळाले, मला ताक हवे हे रस्त्यावरील अनोळखी जोडप्यालाही माहीत नव्हते , मग हे ताक देऊन माझी तृष्णा कोणी भागविली असेल ? अन साक्षात बालाजी नजरेसमोर उभा राहिल्याचा भास झाला , डोळ्यात भक्ती रसाने अक्षरशः पाणी आले , देव भक्तांचे लाड करतो म्हणतात ते असे…
या प्रवासात कोठे ही हॉटेल व घर मुक्कामासाठी वापरले नाही . मंदिर ,शाळा , पेट्रोलपंप याठिकाणी थांबून स्वतः हाताने भोजन बनवीत असे .
याच दरम्यान रस्त्यातील एक मंदिर वेळ झाल्याने बंद करण्यात आले होते बंद केल्यावर ते सकाळी उघडण्याची प्रथा होती पण त्यांच्यासोबत संवाद साधल्यावर माझी यात्रा माहीत झाल्यावर पुन्हा मंदिर उघडून त्या गावातील सर्वांनी आमच्या भोजनाची व्यवस्था केली .
पदयात्रा अंतिम टप्प्यावर आल तिनंतर तिरुपती देवस्थानने हार फुले देऊन स्वागत केले . मोफत दर्शन देऊ केले . त्यास नकार देत पायी जाऊन सामान्य भाविकाप्रमाणे दर्शन घेतले . तो दिवस होता गुढी पाडव्याचा . आपल्या मराठी नववर्ष स्वागताचा
तिरुपतीच्या प्रांगणात त्यांच्या सौभाग्वतीने फोन करून कळविले . त्यासद्धा वाहनाने दाखल होऊन जोडीने दर्शन घेऊ , हे ऐकून सांडभोर अचंबित झाले. पाडव्याला पुन्हा एकदा जोडीने दर्शन घेऊन यात्रा संपन्न झाली .

‘ पायी यात्रेत सारथी बनलेले त्यांचे मित्र रवी कुलकर्णी , यात्रा निर्विघ्न व्हावी यासाठी कुटुंबाचा पाठिंबा व अनेक मित्र व नातेवाईक यांचा आशीर्वाद व खुद्द बालाजीच्या स्वप्न दर्शनाने यात्रा पूर्ण झाली यासाठी मी सर्वांचा ऋणी आहे..’ अरविंद सांडभोर , तिरूपती बालाजीचे निस्सीम भक्त .

✍🏻संपादक – देवराम भेगडे
























