रावेत , किवळेसह मामुर्डी भागातील नव्याने विकसित होत असलेल्या बांधकाम प्रकल्पांना पाणी कनेक्शन देऊ नये- नगरसेविका रेश्मा कातळे
किवळे : विकासनगर , रावेतसह मामुर्डी भागातील नव्याने विकसित होत असलेल्या बांधकाम प्रकल्पांना पाणी कनेक्शन देऊ नये, अशी मागणी नगरसेविका रेश्मा कातळे यांनी मनपा आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे .
प्रभागाच्या विविध भागांत तसेच विविध सोसायट्यांमध्ये अपुऱ्या दाबाने व अनियमित पाणीपुरवठा केला जात आहे. नागरिक व महिला वर्ग त्रस्त झाले आहेत . पाणी पुरवठयाबाबत तक्रारी वाढत चालल्या आहेत . या पार्श्वभूमीवर नव्याने विकसित होत असलेल्या परवानगी दिलेल्या व खाजगी बांधकाम प्रकल्पांना पाणीपुरवठा करू नये . प्रथम पिण्याचे पाणी, नंतर बांधकामे हा निकष ठेवावा. पाणीपुरवठ्याची परिस्थिती सुरळीत होत नाही, तोपर्यंत नवीन बांधकामांना पाणीपुरवठा देऊ नये, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

























