आषाढी वारीला निघालात या वस्तू जरुर घ्या –
देहू :आषाढी पायी वारीसाठी विविध भागातून मोठ्या प्रमाणात वारकरी व भाविक यांची निघण्याची तयारी पूर्ण झाली असून गेली अनेक वर्षे आषाढी पंढरपूर पायी वारी
वारीला निघालात या वस्तू जरुर घ्या –
* वारकरी संप्रदायिक भजनी मालिका .
* किट – १) आपली आवश्यक औषधें २) अंगदुखी , डोकेदुःखी ४) ताप सर्दी इत्यादी
* वळकुटी – मिनी सतरंजी , त्याच आकाराचा प्लास्टिकचा कागद .
* कपड्यांची बॅग
*ताट तांब्या चमचा इत्यादी.
* मोबाईल चार्जर तसेच एखादे एक्स्टेंशन बोर्ड असेल तर आपल्या सोबत इतर वारकऱ्यांचीही मोबाईल चार्जिंग सोय होते .
*पुरुषांनी विशेष करून सांप्रदायिक पोषक वापरावा. (शुभ्र सदरा धोतर , पायजमा व टोपी )
* महिलांनी शक्यतो साडी वगैरे कपडे घ्यावीत
****
किट क्र २ – कैची , सुई , धागा इत्यादी वेळी प्रसंगी अचानक गरज भासू शकते .
* शक्यतो जे प्रथम वरीला येत आहेत त्यांनी शुद्ध पाणीच प्यावं वारी दरम्यान शासनाच्या टँकरचेच पाणी प्यावे.
* शबनम बॅग – दिवसरभराच्या प्रवासात सामानाची बॅग अर्थात वळकुटी ट्रक मध्ये टाकलेली असते ती रात्रीच्या मुक्कामवर मिळते , म्हणून शबनम किंवा लहान बॅग ही आपल्या सोबत असावी जेणेकरून त्यात भजनी मालिका, टाळ, काही औषधे , पाण्याची बॉटल त्यात ठेवता येतील.
* मुक्कामाच्या ठिकाणी पाणी उपलब्ध झाले तर कपडे धुण्याकरिता लागणारी सामुग्री . पाण्याची काटकसर करा मुख्यतः सुकवण्याकरिता लांब दोरी वापरा.
** लहान प्लास्टिकचा कागद बॅगेत जवळ बाळगा.जेणेकरून पालखी सेाहळा विसाव्याला थांबला असता त्यावेळी आराम करण्याकरिता उपयोग होतो.
* छत्री किंवा रेनकोट पावसापासून संरक्षण करण्यासाठी घ्या.
* एक मोठी गोण त्यावर ठळक अक्षराने आपले नाव व क्रमांक पत्ता लिहिलेला असावे.
* आपल्या नावचे ओळखपत्र आपल्या खिशात ठेवावे दिंडीत गेल्यावर सहसा दिंडी सोडू नये पण कदाचित चुका- मूक झाली असता भेट घडावी म्हणून पहिल्याच दिवशी सहकारी वर्गाचे दूरध्वनी क्रमांक व दिंडीची कार्यपत्रिका सोबत ठेवावी.


























