भारत देशाला योग्यांची व शुरांची परंपरा आहे . प्रत्येक शुरामागे संत आहेत – ह.भ.प.एकनाथमहाराज सदगीर
देहूरोड : भारत देशाला योग्यांची व शुरांची परंपरा आहे . प्रत्येक शुरामागे संत आहेत. समाजाला नावीन्य पाहिजे . अध्यात्माशिवाय पर्याय राहिलेला नाही . संत कृपेच्या व्यापकतेचा विचार संत बहिणाबाईंनी मांडला आहे . सद्यस्थितीत आपण मनात आणले तर इंद्रायणी स्वच्छ होऊ शकते , असे प्रतिपादन प्रख्यात कीर्तनकार ह. भ.प. एकनाथमहाराज सदगीर यांनी केले .
श्रीक्षेत्र घोरवडेश्वर विकास प्रतिष्ठान, अखंड हरीनाम सप्ताह

हरिनाम सप्ताहात हभप यतिराजमहाराज लोहर, नितीनमहाराज काकडे , मुंकुंदमहाराज राऊत , संतोषमहाराज पटारे, विलासमहाराज बागल हे व्यासपीठ नेतृत्व करीत आहेत .
हभप सदगीर महाराजांनी संत बहिणाबाईंच्या ‘ संत कृपा झाली ।इमारत फळा आली ॥ ‘ या अभंगाचे निरूपण केले. ते म्हणाले , श्रोते तयार झाले तर सध्याचे कीर्तनकार ध्यानावर येतील, श्रोत्यांना ज्ञानात भर टाकण्यासाठी कीर्तनाला आले पाहिजे .


























