- न्यायालयाने जिल्हा परिषदेसह पंचायत समिती निवडणुका घेण्यासाठी दिली १५ दिवसांची मुदतवाढ : १५ फेब्रुवारी २०२६ पर्यंत निवडणूका पूर्ण कराव्या लागणार
पुणे : मनपा निवडणुकांनंतर जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका होणार असल्याने सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेत निवडणुकांसाठी मुदतवाढ मिळण्याची मागणी केली होती. निवडणूक आयोगाला सुप्रीम कोर्टाकडून दिलासा मिळाला असून जिल्हा परिषद निवडणुकांसाठी २ आठवड्यांची मुदतवाढ मंजूर केली आहे.
निवडणूक आयोगाकडून जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका घेण्यासाठी १० फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ द्या, असा अर्ज सर्वोच्च न्यायालयाकडे करण्यात आला होता. यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाला ३१ जानेवारी २०२६ पर्यंत वेळ दिली होती. मात्र, राज्यातील १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांमध्ये ५० टक्क्यांमध्ये आरक्षण आहे. तर इतर २० जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत ५० टक्के आरक्षण मर्यादा ओलांडली गेली असल्यामुळे त्याविषयी काय निर्णय होणार, यावर अद्याप प्रश्नचिन्ह आहे. दरम्यान १२ जानेवारीला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. न्यायालायने आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितींच्या निवडणुका पुढे ढकलण्यास परवानगी दिली आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या मागणीनुसार सर्वोच्च न्यायालयाने जिल्हा परिषदेच्या निवडणुका घेण्यासाठी १५ दिवसांची मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे, आता १५ फेब्रुवारी २०२६ पर्यंत निवडणूका पूर्ण कराव्या लागणार आहेत .

✍🏻संपादक – देवराम भेगडे

























